add

नैसर्गिक गोष्टींत बदल करण्याचा प्रयत्नम निष्फळच ठरतो.

एकदा एका डोमकावळ्याला असे वाटले की आपण राजहंसाप्रमाणे पांढरे शुभ्र व्हावे. राजहंस पाण्यात राहतो आणि पाण्याने अंग नेहमी धुतो तसेच आपण करावे म्हणून त्याने राजहंसाप्रमाणे पाण्यात राहण्यास सुरुवात केली. परंतु, पाण्यात राहून त्याचा रंग तर बदलला नाहीच पण लवकरच थंडी झाल्याने तो मरण पावला.

तात्पर्य - नैसर्गिक गोष्टींत बदल करण्याचा प्रयत्‍न निष्फळच ठरतो.